﻿<?xml version="1.0" encoding="utf-8"?>
<rss version="2.0">
  <channel>
    <title>महाराष्ट्र-कर्नाटक</title>
    <link>http://72.78.249.126/DainikGomantak/mahkar.htm</link>
    <description>mahkardainikgomantak.com © CopyRight Dainik Gomantak2010</description>
    <language>en-US</language>
    <pubDate>7/7/2010 5:44:52 AM</pubDate>
    <ttl>60</ttl>
    <image>
      <title>visit http://www.dainikgomantak.com</title>
      <link>http://www.dainikgomantak.com</link>
      <url>http://72.78.249.126/DainikGomantak/images/logo.gif</url>
      <width>253</width>
      <height>64</height>
    </image>
    <item>
    <title>माओवाद्यांच्या बंदचा बाजारपेठ, वाहतुकीवर परिणाम</title>
    <link>http://72.78.249.126/DainikGomantak/20100707/5420025219481840374.htm</link>
    <description>गडचिरोली -&amp;nbsp  नक्षल नेता आझाद यांच्या हत्येच्या निषेधार्थ माओवाद्यांनी आज (ता.सात व आठ) ला पुकारलेल्या बंदमुळे नक्षलग्रस्त भागात अनेक ठिकाणी बाजारपेठ व वाहतूक बंद होती. आलापल्ली- सिरोंचा मार्गावरील गोलागर्जी गावाजवळ माओवाद्यांनी रस्त्यात झाडे तोडून टाकल्याने या मार्गाची वाहतूक आज सकाळ पासूनच बंद होती. खबरदारीचा उपाय म्हणून एस.टी. महामंडळाने दुर्गम भागातील अनेक मार्गाच्या बस फेऱ्या बंद ठेवल्या आहेत. बंद हाणून पाडण्यासाठी पोलिस प्रशासनानेही जिल्हात चोख बंदोबस्त लावला आहे.माओवाद्यांच्या बंदचा शाळा महाविद्यालय व शासकीय कामकाजावर मोठा परिणाम दिसून आला.</description>
    <author>---</author>
    <pubDate>Wed,7 Jul 2010 20:24:59 +0550</pubDate>
  </item>
    <item>
    <title>माउली निघाली पंढरपूरकडे</title>
    <link>http://72.78.249.126/DainikGomantak/20100707/5295136126931462279.htm</link>
    <description>विठ्ठलाच्या भेटीसाठी निघालेल्या लाखो वारकऱयांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी सहा वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीतून पुण्याकडे निघाली. पंढरपूरच्या प्रवासात आळंदी ते पुणे हा सुमारे २१ किलोमीटरचा टप्पा आहे. अधूनमधून येणाऱया पावसाच्या सरी, ढगाळ हवामान आणि मध्येच कडकडीत ऊन अशा समिश्र वातावरणात वारकऱयांनी पुण्याकडे मार्गक्रमण केले.</description>
    <author>---</author>
    <pubDate>Wed,7 Jul 2010 5:30:0 +0550</pubDate>
  </item>
    <item>
    <title>जोतिबाच्या डोंगरावरून एसटी कोसळली; दोन ठार</title>
    <link>http://72.78.249.126/DainikGomantak/20100610/5141428201344758359.htm</link>
    <description>कोल्हापूर - सांगलीहून श्री क्षेत्र जोतिबाकडे निघालेली राज्य परिवहनमहामंडळाची बस दरीत कोसळून दोन भाविक मृत पावल्याची आणि १५ जण जखमीझाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी सकाळी हा अपघात झाला. याघटनेनंतर तातडीने घटनास्थळी मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.  &amp;nbsp  जखमींनाकोल्हापूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. अपघाताचे नेमके कारणअद्याप स्पष्ट झालेले नाही. सांगलीहून आलेली एसटी बस कोल्हापूरमार्गेजोतिबाच्या डोंगराकडे निघाली होती. त्यावेळी हा अपघात झाला. गाडीमध्येनेमके किती प्रवासी होते, याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.</description>
    <author>---</author>
    <pubDate>Thu,10 Jun 2010 19:45:0 +0550</pubDate>
  </item>
    <item>
    <title>सिंधुदुर्ग वाहतूक सेवा ३१ ऑगस्टपर्यंत बंद</title>
    <link>http://72.78.249.126/DainikGomantak/20100603/5307359011074187823.htm</link>
    <description>मालवण, ता. १ : किल्ला प्रवासी होडी वाहतूक सेवा आजपासून ३१ ऑगस्टपर्यंत पूर्णत: बंद करण्यात आली आहे. दरम्यान, पर्यटन हंगामात येथील सिंधुदुर्ग किल्ल्यास ५५ हजार २९८ पर्यटकांनी भेट दिली. येथील सिंधुदुर्ग किल्ल्यास भेट देण्यास येणाऱ्या प्रवाशांची वाहतूक सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेच्या माध्यमातून केली जाते. पावसाळा जवळ आल्याने तसेच समुद्रातील बदलामुळे येथील बंदर विभागाच्या वतीने २६ मेपासून अधिकृतरीत्या होडी वाहतूक सेवा बंद करण्याच्या सूचना होडी व्यावसायिकांना दिल्या होत्या. त्यानुसार होडी वाहतूक सेवा बंद करण्यात आली  मात्र पर्यटन हंगामामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त असल्याने पर्यटकांनीच होडी वाहतूक सेवा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली. बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणखी चार दिवस होडी वाहतूक सेवा सुरू ठेवण्याचा आदेश दिला.</description>
    <author>---</author>
    <pubDate>Thu,3 Jun 2010 23:22:58 +0550</pubDate>
  </item>
    <item>
    <title>तरुणीवर अत्याचार; गाव पातळीवर प्रकरण मिटले</title>
    <link>http://72.78.249.126/DainikGomantak/20100603/5182820984411004156.htm</link>
    <description>सावंतवाडी, ता. १ : कारिवडे परिसरातील तरुणीवर अत्याचाराचे प्रकरण आज येथील पोलिस ठाण्यात आले. संबंधिताने अत्याचारग्रस्त तरुणीची जबाबदारी घेण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे तूर्तास पोलिस ठाण्यात तक्रार नोंद झालेली नाही  मात्र तक्रार आल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अविनाश काळदाते यांनी आज दिली. कारिवडे परिसरातील तरुणीच्या असाह्यतेचा गैरफायदा घेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आले. नोकरीचे आमिष दाखवून व असाह्यतेचा गैरफायदा घेऊन गेले काही दिवस चाललेले हे प्रकरण गाव पातळीवरच मिटविण्याचे प्रयत्न होते. त्या मुलीबाबत घडलेल्या या प्रकाराची जाहीर वाच्यता होऊ नये, यासाठी संबंधितांनी आवश्‍यक ती सर्व खबरदारी घेतली. कुणालाही याची कानोकान खबर लागू नये, याकरिता त्या मुलीचे लग्न ठरविण्याचा घाट घालण्यात आला. संबंधित युवती सुशिक्षित असल्याने तिला स्थळ शोधून देऊन संबंधिताने तो मी नव्हेच असा विश्‍वामित्री पावित्रा घेण्याची शक्कल लढविली. त्याप्रमाणे काही दिवसांपूर्वी संबंधित अत्याचारग्रस्त तरुणीचे ओटवणे परिसरातील तरुणाशी लग्न लावून देण्यात आले. लग्नानंतर काही दिवसांनी घरच्यांना संशय आला.</description>
    <author>---</author>
    <pubDate>Thu,3 Jun 2010 23:22:22 +0550</pubDate>
  </item>
  </channel>
</rss>
