﻿<?xml version="1.0" encoding="utf-8"?>
<rss version="2.0">
  <channel>
    <title>संपादकीय</title>
    <link>http://72.78.249.126/DainikGomantak/Sampadakiya.htm</link>
    <description>Sampadakiyadainikgomantak.com © CopyRight Dainik Gomantak2012</description>
    <language>en-US</language>
    <pubDate>2/1/2012 12:49:36 PM</pubDate>
    <ttl>60</ttl>
    <image>
      <title>visit http://www.dainikgomantak.com</title>
      <link>http://www.dainikgomantak.com</link>
      <url>http://72.78.249.126/DainikGomantak/images/logo.gif</url>
      <width>253</width>
      <height>64</height>
    </image>
    <item>
    <title>मगो सरकारबाहेर (अग्रलेख)</title>
    <link>http://72.78.249.126/DainikGomantak/20120201/5381031655325583918.htm</link>
    <description>गे ली पाच वर्षे कॉंग्रेसबरोबर आघाडीत राहून सत्ता उपभोगलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने अखेर सरकारमधून बाहेर पडायचा निर्णय केला आहे. सरकारात मंत्री म्हणून सामील असलेले आमदार सुदिन ढवळीकर यांनाही मंत्रिपद सोडायला पक्षाच्या केंद्रीय समितीने सांगितले आहे. आपण पक्षशिस्तीनुसार जाणार असल्याचे ढवळीकर यांनी म्हटलेले असले तरी समितीने नेमके काय ठरविले याची रीतसर माहिती मिळाल्यावर आणि काही सल्लामसलत करूनच ते मंत्रिपद सोडतील, अशी आताची स्थिती आहे. समितीने इकडे सांगितले आणि तिकडे मंत्रिपद सोडले, असे काही घडणार नाही. त्यामुळे आणि अन्यही काही कारणामुळे पक्षाच्या केंद्रीय समितीने सरकारमधून बाहेर पडायचा घेतलेला निर्णय प्रत्यक्षात आलेला दिसायला एक-दोन दिवस किंवा त्याहून अधिक अवधीही जाऊ शकेल. सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय पक्षाने केल्याने मगोची भारतीय जनता पक्षाशी युती होण्याचा मार्ग सुकर झाला इथपासून सरकारमध्ये राहून मागची निवडणूक लढविल्याने पक्षाला फटका बसला होता, ती स्थिती सुधारेल इथपर्यंत अनेक अर्थ या निर्णयाच्या अनुषंगाने काढले जाऊ लागले आहेत.</description>
    <author>---</author>
    <pubDate>Wed,1 Feb 2012 22:21:56 +0550</pubDate>
  </item>
    <item>
    <title>गुन्हेगारांना पुन्हा प्रतिष्ठा (अग्रलेख)</title>
    <link>http://72.78.249.126/DainikGomantak/20120201/4758290435139582918.htm</link>
    <description>राजकारणी आणि गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेली मंडळी यांचे संबंध असणे भारतीय राजकारणाला नवे नाही. एके काळी काही राजकारणी काही गुन्हेगारांची आपल्या कामासाठी मदत घेत. आपल्या प्रतिस्पर्ध्याला त्रास देणे वा प्रसंगी संपविणे, जमिनी बळकावून तेथे अनधिकृत बांधकामे घडवून आणणे, झोपडपट्ट्या आणि काही वस्त्यांमध्ये दहशत निर्माण करणे, बिल्डरांसाठी वस्त्या रिकाम्या करायला लावणे अशा कामांसाठी या गुन्हेगारांचा वापर अनेक राजकारणी करून घेत  पण गेल्या काही वर्षांत राजकारण्यांसाठी कामे करणाऱ्या आणि त्यांना पैसा देणाऱ्या या गुन्हेगारांनाच सत्तेची हाव निर्माण झाली आहे. राजकारणी वा राजकीय पक्षही निर्लज्जपणे गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या लोकांना वा त्यांच्या जवळच्या नातेवाइकांना निवडणुकीच्या राजकारणात उमेदवारी देऊ लागले आहेत. त्यासाठी महाराष्ट्रात अनेक गुन्हेगारांनी आपला व्यवसायच बदलला. त्यांच्यापैकी काही जण पूर्णवेळ राजकारणी झाले, काहींनी बांधकाम व्यवसाय सुरू केला, तर काही चित्रपटनिर्मितीच्या व्यवसायातच उतरले. त्यामुळे ते व्हाइट कॉलर झाले.</description>
    <author>---</author>
    <pubDate>Wed,1 Feb 2012 10:30:0 +0550</pubDate>
  </item>
    <item>
    <title>जळत्या घरात प्रकाश आंबेडकर (अग्रलेख)</title>
    <link>http://72.78.249.126/DainikGomantak/20120131/5046843846474089619.htm</link>
    <description>"कॉंग्रेस हे जळते घर आहे,' असे विधान खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले होते  पण त्यास प्रदीर्घ काळ लोटला! आता त्याच जळक्‍या घरात बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी प्रवेश केला आहे. गेली जवळपास 15 वर्षे प्रकाश आंबेडकर हे आपल्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्ष आणि बहुजन- भारिप महासंघ यांच्या माध्यमातून कॉंग्रेसविरोधाचे राजकारण करत होते आणि या काळात रामदास आठवले हे कॉंग्रेसच्या वळचणीला बसून सत्तेचे जे पद हाती लागेल, ते स्वीकारत होते. मात्र, आता आठवले यांना या सत्तापदाचा विसर पडला आणि त्यांनी शिवसेना-भाजप युतीशी हातमिळवणी केली. लगोलग प्रकाश आंबेडकर यांना कॉंग्रेसचा शेजार आपलासा वाटू लागला आहे. त्यामुळे त्यांनी आठवडाभरावर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेसबरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापाठोपाठ होणाऱ्या महापालिका निवडणुकांतही कॉंग्रेसच्या वाट्याच्या काही जागा त्यांना हव्या असणारच. खरे तर या निवडणुकीसाठी केवळ कॉंग्रेसच नव्हे, तर खुद्द प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप-बहुजन महासंघाच्या उमेदवारांचे तिकीटवाटपही झाले आहे. तरीही हा नवा घरोबा दोघांनाही हवा आहे.</description>
    <author>---</author>
    <pubDate>Tue,31 Jan 2012 10:30:0 +0550</pubDate>
  </item>
    <item>
    <title>उत्तम आरोग्यसेवेतूनच शाश्‍वत विकास</title>
    <link>http://72.78.249.126/DainikGomantak/20120131/5686683895490252200.htm</link>
    <description>"प्र गतशील महाराष्ट्र' या सदरात मुख्यमंत्र्यांनी "शाश्‍वत विकास' व "व्यापक सामाजिक हिताचे राजकारण' यावर भर दिला, हे स्वागतार्ह आहे. पण त्यांच्या मांडणीत आरोग्य, शिक्षण यांचा अनुल्लेख खटकला. खरे तर शाश्‍वत विकासात त्यांना अग्रक्रम असायला हवा. महाराष्ट्रातील परिस्थिती याबाबत चिंताजनक आहे. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक असला, तरी राहणीमानाच्या दर्जाबाबत 21 वा, व दरडोई सरकारी आरोग्यखर्चाबाबत 20 वा, बालमृत्यूबाबत 10 वा, तर गरोदरपणी तपासणी होण्याबाबत 17 वा आहे. कुपोषण आदिवासी मुलांपर्यंत मर्यादित नाही. मुंबईतही 40 टक्के मुले कुपोषित आहेत. "परवडत नाही' म्हणून उपचारच न घेण्याऱ्यांचे प्रमाण गरिबांमध्ये 60 टक्के आहे. ग्रामीण-शहरी दरी मोठी आहे. दर लाख लोकसंख्येमागे अनुक्रमे 24 व 140 ऍलोपॅथिक डॉक्‍टर ग्रामीण व शहरी भागात आहेत. तरी महाराष्ट्र सरकारचा आरोग्यखर्च ग्रामीण व शहरी भागासाठी विषम म्हणजे अनुक्रमे दरडोई वर्षाला 114 व 275 रु. आहे. नियोजन मंडळाच्या उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीने शिफारस केली आहे, की सार्वजनिक आरोग्यसेवेत सुधारणा, तसेच वाढ करायला हवी व तिथे शुल्क घेणे बंद करावे.</description>
    <author>---</author>
    <pubDate>Tue,31 Jan 2012 10:15:0 +0550</pubDate>
  </item>
    <item>
    <title>झळाळत्या यशाचा "पेस' (अग्रलेख)</title>
    <link>http://72.78.249.126/DainikGomantak/20120130/5465165071524036839.htm</link>
    <description>भारतीय क्रिकेट संघ कांगारूंच्या भूमीत भुईसपाट होत असताना तेथील टेनिस कोर्टवरील लिअँडरच्या यशाचा आलेख खंडप्राय देशाचे क्रीडा क्षेत्र लख्ख प्रकाशमान करणारा तर आहेच  परंतु त्याचबरोबर सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, लक्ष्मण या बुजुर्ग खेळाडूंनाही धडा देणारा आहे. पस्तिशीच्या पुढे असलेल्या या तिन्ही क्रिकेटपटूंसमोर लिअँडरने वाढत्या वयातही जिद्दीने कसा खेळ करता येतो आणि विजेतेपदाला कशी गवसणी घालता येते, याचा वस्तुपाठ घालून दिला. भारतीय फलंदाजांनी 22 यार्डाच्या खेळपट्टीवर साफ नांगी टाकली  परंतु लिअँडर पेसने 78 बाय 36 फुटांच्या कोर्टवर सातत्याने वेगवान खेळ करीत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपद पटकावून 38 व्या वर्षीही आपल्यातील लढाऊ वृत्ती कायम असल्याचे दाखवून दिले. माजी ऑलिंपियन हॉकीपटू डॉ. व्हेस पेस यांच्या मुलाने आजपर्यंतच्या अनेक संकंटांवर मात करीत "करिअर ग्रॅंडस्लॅम' पूर्ण केले. त्यामुळे त्याच्या यशाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. लिअँडरने याआधी फ्रेंच, विंबल्डन आणि अमेरिकन या तिन्ही ग्रॅंडस्ल्रॅम स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते  परंतु त्याला ऑस्ट्रेलियन स्पर्धा जिंकता आली नव्हती.</description>
    <author>---</author>
    <pubDate>Mon,30 Jan 2012 8:30:0 +0550</pubDate>
  </item>
    <item>
    <title>अस्मितेच्या चाकोरीतच नवी समीकरणे</title>
    <link>http://72.78.249.126/DainikGomantak/20120130/5306380205319808183.htm</link>
    <description>मं  डल आणि मंदिर या मुद्‌द्‌यांभोवती 1990च्या दशकातले देशाचे राजकारण केंद्रित झालेले दिसते. या मुद्‌द्‌यांच्या राजकारणाचे केंद्र उत्तर प्रदेश होते. या काळात तेथे दलित, ओबीसी आणि उच्चजातीय या जनसमूहांच्या राजकीय आकांक्षा टोकदारपणे व्यक्त झाल्या. सामाजिक न्याय आणि हिंदुत्व या दोन विचारप्रणालींच्या आधारे दलित, ओबीसी व उच्चजातीय समाजगटांचे राजकीय संघटन या काळात केले गेले. या समाजगटांचे संघटन करणाऱ्या राजकीय पक्षांनी दलित विरुद्ध उच्च जाती, ओबीसी विरुद्ध उच्च जाती, दलित विरुद्ध ओबीसी, हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी मित्रभावी - शत्रूभावी मांडणी करणारे राजकारण केले. या प्रक्रियेतून तेथे काही विशिष्ट समाजगटांची मते एकगठ्ठा मिळवणारे पक्ष प्रबळ झाले. बहुजन समाज पक्षाला दलितांची, समाजवादी पक्षाला यादवांची  तर भाजपला यादवेतर ओबीसी आणि उच्चजातीयांची मते एकगठ्ठा मिळू लागली. हे सर्व पक्ष 1990 पूर्वी राज्याच्या राजकारणात नाममात्रच होते. ते प्रबळ झाल्यामुळे कॉंग्रेसचे राज्यावरील वर्चस्वही संपुष्टात आले.</description>
    <author>---</author>
    <pubDate>Mon,30 Jan 2012 8:15:0 +0550</pubDate>
  </item>
    <item>
    <title>निवडणूक निकालांवर ठरणार केंद्राचा चेहरा</title>
    <link>http://72.78.249.126/DainikGomantak/20120130/5325834553274281789.htm</link>
    <description>पा  च राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया सध्या सुरू आहे. सर्वांचे लक्ष मार्चमध्ये लागणाऱ्या त्यांच्या निकालांकडे आहे. हे निकाल केवळ पाच राज्यांमधील सरकारपुरते मर्यादित नाहीत. केंद्रातील सत्तारूढ डॉ. मनमोहनसिंग सरकारच्या स्थैर्याशीही ते निगडित आहेत. अशी स्थिती निर्माण होण्याचे कारण काय? या निवडणुकांच्या निमित्ताने काही वेगळीच राजकीय समीकरणे आकाराला आलेली दिसत आहेत. केंद्रात आणि पश्‍चिम बंगालमध्ये परस्परसहकार्याने सरकार चालविणारे कॉंग्रेस व तृणमूल कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष या निवडणुकीत परस्परांच्या विरोधात ठाकले आहेत. तसाच प्रकार दुसरा राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील महत्त्वाचा घटकपक्ष, भाजपचा विश्‍वासू व बिहारमध्ये भाजपबरोबर आघाडी सरकार चालविणारा संयुक्त जनता दल (जेडीयू) हा पक्षदेखील उत्तर प्रदेशात स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरला आहे.</description>
    <author>---</author>
    <pubDate>Mon,30 Jan 2012 8:0:0 +0550</pubDate>
  </item>
    <item>
    <title>प्रशिक्षणच दिले नसल्याने उपकरणे कशी हाताळणार? - गोमेकॉतील कर्मचाऱ्यांपुढे प्रश्‍न</title>
    <link>http://72.78.249.126/DainikGomantak/20120128/5551623792732518616.htm</link>
    <description>पणजी, ता. 27 ः गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय उपकरणे हाताळण्यासाठी कर्मचाऱ्यांना तांत्रिक प्रशिक्षण वेळोवेळी दिले जात नसल्याने अपघात घडत असल्याची माहिती पुढे आली आहे. इस्पितळात नवीन उपकरणे आणल्यानंतर ती कशी हाताळावीत, याची माहिती परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांना दिली जात नाही. काही वरिष्ठ डॉक्‍टरांनाच त्याची माहिती असते. पण त्यांच्या गैरहजेरीत हाताखालच्या कर्मचाऱ्यांना ती हाताळता येत नाहीत. बालचिकित्सा विभागातील वॉर्मर यंत्रणेच्या बाबतीत धोक्‍याची स्थिती निर्माण झाली आहे.&amp;nbsp     नवजात बालकाचे वजन कमी असल्यास किंवा वेळेपूर्वी बाळ जन्मल्यास त्याला ऊब देण्यासाठी वॉर्मरमध्ये ठेवले जाते. पण ही यंत्रणा सुरक्षितपणे हाताळता येत नसल्याने वर्षभरात तीन बालके दगावली आहेत. त्यातच वॉर्मरला आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. तरीही वॉर्मरच्या सुरक्षेकडे गंभीरपणे लक्ष देण्यात आलेले नाही. काही नवीन उपकरणे कोणालाही हाताळता येत नसल्याने पडून आहेत. त्यामुळे ती गंजून गेली आहेत. काही यंत्रोपकरणे मोडकळीस आली असतानाही त्यांचा वापर केला जात आहे. इतर उपकरणांच्या बाबतीत हीच स्थिती आहे. यामुळे रुग्णांचा जीव धोक्‍यात येत आहे.</description>
    <author>---</author>
    <pubDate>Sat,28 Jan 2012 9:30:0 +0550</pubDate>
  </item>
    <item>
    <title>पाळोळे किनाऱ्यावरील दुकानांना आग - 15 लाखांचे नुकसान</title>
    <link>http://72.78.249.126/DainikGomantak/20120128/5456123252747664801.htm</link>
    <description>काणकोण, ता. 27 ः जगाच्या पर्यटन नकाशावर असलेली पाळोळे किनारपट्टी हळू हळू मानवनिर्मित आपत्तीच्या दिशेने सरकत आहे. त्याची चाहूल बुधवारी (ता. 25) घडलेल्या आगीच्या दुर्घटनेने लागली आहे. या आगीत तीन कपड्यांची व वाद्यांची दुकाने जळून खाक झाली. अग्निशामक दलाच्या माहितीप्रमाणे या आगीत 15 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, दुकानदारांनी या आगीत 50 लाखांपेक्षा जास्त किमतीचा माल जळाल्याचा दावा केला आहे. आग विझविण्यासाठी सावर्डे, कुंकळ्ळी मडगाव येथून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. तरीही पहाटे 2 वाजेपर्यंत आग आटोक्‍यात येत नाही हे पाहून खासगी टॅंकरने पाण्याचा पुरवठा करण्यात आला. या आगीत वल्लू ईश्वर नायक, पप्पू छत्रीय कारभारी (कर्नाटक), अजय कांजा (गुजरात) यांची कपड्यांची दुकाने व हमीद शेख ढोलकीवाला (कर्नाटक) यांचे वाद्यांचे दुकान या आगीत जळाले.    आग विझविण्याची साधने नव्हती   किनारी हंगामी दुकानांत आग विझविण्याचे "फायर एक्‍सटिगुशर' हे यंत्र ठेवणे गरजेचे आहे. मात्र, या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या एकाही दुकानात ही यंत्रणा नव्हती.</description>
    <author>---</author>
    <pubDate>Sat,28 Jan 2012 8:45:0 +0550</pubDate>
  </item>
    <item>
    <title>महत्त्वाकांक्षी राजकारण्यांची शर्यत - गोमन्तनगरी</title>
    <link>http://72.78.249.126/DainikGomantak/20120128/5469204749202731272.htm</link>
    <description>गो  वा विधानसभा निवडणुकीची अधिसूचना येत्या 6 फेब्रुवारी रोजी जारी होणार असल्यामुळे येत्या आठवड्यात  प्रमुख राजकीय पक्षांचे किमान 75 टक्केपर्यंत उमेदवार जाहीर होणार आहेत. अपक्ष, प्रादेशिक पातळीवर नव्याने स्थापन झालेल्या, संजीवनी मिळालेल्या गोवा विकास पार्टीसारख्या पक्ष, गटांतून उमेदवारांची नावे घोषित झाली आहेत. त्यामुळे त्यांची उमेदवारी पहिल्या टप्प्यात अपेक्षित आहे. कॉंग्रेस भाजप या दोन राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारीसाठी काही मतदारसंघात बरेच महत्त्वाकांक्षी राजकारणी शर्यतीत आहेत. त्यात अर्थकारणाचे वर्चस्व असल्यामुळे काही ठिकाणी वर्षानुवर्षे पक्षासाठी राबणाऱ्या निष्ठावंतांची तिलांजली देऊन नव्यांना संधी मिळाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही. नवे चेहरे समोर आणताना फक्त निष्ठावंत बाजूला पडतात असे नव्हे तर मतदारसंघातल्या स्थानिकांना गृहीत धरले जाते.</description>
    <author>---</author>
    <pubDate>Sat,28 Jan 2012 7:30:0 +0550</pubDate>
  </item>
  </channel>
</rss>
