﻿<?xml version="1.0" encoding="utf-8"?>
<rss version="2.0">
  <channel>
    <title>शब्दसोहळा</title>
    <link>http://72.78.249.126/DainikGomantak/ShabdSohala.htm</link>
    <description>ShabdSohaladainikgomantak.com © CopyRight Dainik Gomantak2012</description>
    <language>en-US</language>
    <pubDate>2/5/2012 6:08:39 AM</pubDate>
    <ttl>60</ttl>
    <image>
      <title>visit http://www.dainikgomantak.com</title>
      <link>http://www.dainikgomantak.com</link>
      <url>http://72.78.249.126/DainikGomantak/images/logo.gif</url>
      <width>253</width>
      <height>64</height>
    </image>
    <item>
    <title>विजेसाठी अणुऊर्जेचाच मोठा आधार असेल (डॉ शिवराम भोजे)</title>
    <link>http://72.78.249.126/DainikGomantak/20120205/4878456479444691607.htm</link>
    <description>अणुऊर्जेची वाढ ही पुढच्या शंभर वर्षांत कशी होईल, हे अनेक गोष्टींवर अवलंबून असेल. ऊर्जेची मागणी ही फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोळसा, तेल व गॅस यांचे साठे फार कमी राहतील व त्यांच्या किमती भरमसाट वाढलेल्या असतील. अणुऊर्जा ही सर्वांत जास्त सुरक्षित ऊर्जा आहे. पण, लोकांचा असा गैरसमज होतो, की अणुऊर्जा धोक्‍याची आहे.     डॉ. होमी भाभा व पंडित नेहरू यांच्या दृरदृष्टीतून 1948 मध्ये अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाली. त्याचे अध्यक्ष डॉ. भाभा होते. अणुऊर्जा विभाग 1954 ला स्थापन झाला. अणुऊर्जेच्या धोरणांची अंमलबजावणी करणे, हे त्याचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर 1957 मध्ये मुंबईला तुर्भे येथे भाभा ऍटॉमिक रिसर्च सेंटर (मूळ नाव ऍटॉमिक इनर्जी एस्टॅब्लिशमेंट) स्थापन झाले. भारताच्या पहिल्या दोन अणुसंयंत्रांमधून, 1969 ला तारापूर येथे वीजनिर्मिती सुरू झाली. ही दोन अणुसंयंत्रे अमेरिकेच्या साह्याने बांधली आहेत. त्यांच्या बांधण्याच्या मागे असे हेतू होते, की भारतात उच्च तंत्रज्ञानातील प्रकल्प राबवता व चालवता येतात व यापासून निर्माण होणारी वीज ही किफायतशीर आहे.</description>
    <author>---</author>
    <pubDate>Sun,5 Feb 2012 22:8:1 +0550</pubDate>
  </item>
    <item>
    <title>जगा आणि जगू द्या (भारत सासणे)</title>
    <link>http://72.78.249.126/DainikGomantak/20120205/4740758019823350664.htm</link>
    <description>भारत सासणे author@esakal.com    माझ्या पीएने मला ज्या इमारतीत नेलं होतं त्या इमारतीचं नाव विश्रामगृह असं होतं. मला उगाचच लाक्षागृह आठवलं. या इमारतीत विश्राम करण्यासाठी मात्र कोणी येत नसणार. तिथल्या वातावरणात आढळणारे सूक्ष्म भावनांचे तरंग मी वाचू लागलो. विश्रामगृहातून राजकारण, विश्‍वासघात, व्यभिचार, पैसा, मद्यपान, राजकीय बैठका, कार्यकर्ते व स्वीय सहायक म्हणवणाऱ्या अर्धशिक्षित व अर्धसुसंस्कृत अशा धूर्त लोकांच्या टोळ्यांच्या मनातले संमिश्र भाव- भयगंड अशा विविध गोष्टींचे तरंग वातावरणातून बाहेर येत होते. आम्ही आतल्या आरामशीर अशा खोलीत बसून राहिलो. मी विचारलं,    ""आपण इथं राहणार का?''  ""मी तुमची इथं व्यवस्था केली आहे!... झालंच तर एक गाडी दिमतीला असेल!''  ""मला आजचा माणूस कसा जगतो हे खरं तर पाहायचं आहे!''  ""मग तुम्हाला आमच्या राजकारणात सगळंच पाहायला मिळेल!... इथले आमदार कृष्णाजी तुम्हाला भेटायला येणार आहेत!.... इतक्‍या लवकर आपल्याला यश मिळेल असं वाटलं नव्हतं. आमदारसाहेब घाबरले आहेत.</description>
    <author>---</author>
    <pubDate>Sun,5 Feb 2012 22:6:14 +0550</pubDate>
  </item>
    <item>
    <title>प्रतिभावंतांची प्रेरणा 'सोहनी-महिवाल' (सुप्रिया वकील)</title>
    <link>http://72.78.249.126/DainikGomantak/20120205/5293272413057620765.htm</link>
    <description>सुप्रिया वकील supriyawakil@gmail.com    'रब से जियादा तेरा नाम लेता हूँ...रब मुझे माफ करे'...असं म्हणणाऱ्या सोहनी आणि महिवालची प्रेमकथा मनाला चटका लावून जाणारी. या दोघांचेही मृतदेह पाकिस्तानातील हैदराबादजवळील शाहदादपूरजवळ नदीत सापडले, अशी आख्यायिका आहे. याच ठिकाणी सोहनीची समाधी आहे.    "प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे देणे ' अशा एका गीताच्या ओळी आहेत. असं हे देवाघरचे देणे' असणारे प्रेम काहींच्या जीवनाचा अर्थ, त्याचा मार्गच बदलून टाकतं. हृदयाच्या तळापासून उमलणाऱ्या प्रेमभावनेत सारं आयुष्य पणाला लागलं तरी चालेल  पण प्रेमाची अतिशय घट्ट वीण असणारे काही जीव अखेर मरणाला कवटाळतात  पण आपल्या प्रेमाची साथ सोडत नाहीत. अशाच अजरामर प्रेमकथांपैकी एक लोककथा म्हणजे "सोहनी-महिवाल' यांची प्रेमकथा.    सिंध आणि पंजाब या प्रांतांतील ही अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय प्रेमकथा आहे. फझल शाह सय्यद यांच्या दीर्घकाव्यातून ही कथा जगासमोर आली, त्याचबरोबर अनेक प्रतिभावंत कवींनी ही प्रेमकथा आपापल्या शैलीत शब्दबद्ध केली आहे. तसंच या उत्कट प्रेमकथेनं अनेक मान्यवर चित्रकारांचे कुंचलेही प्रेरित झालेले आहेत.</description>
    <author>---</author>
    <pubDate>Sun,5 Feb 2012 22:2:6 +0550</pubDate>
  </item>
    <item>
    <title>ज्योतीच्या साथीला धावतात युवक (उत्तम कांबळे)</title>
    <link>http://72.78.249.126/DainikGomantak/20120205/5631888648594124442.htm</link>
    <description>उत्तम कांबळे uttam.kamble@esakal.com     लिहिण्याची कल्पना छान आहेच  पण आपण इथं जमलेल्या सर्वांनी महिन्याला पन्नास-शंभर रुपये वर्गणी काढून या मुलीचं शिक्षण पूर्ण केलं तर? सर्वांत जास्त आनंद आपल्याला होईल... आपण एक आयुष्य उभं केलं, ज्योत नव्हे तर फ्लड लाइटच लावला, असं समाधान आपल्याला मिळेल. गावानंच आपल्या गावातील पोरगी घडवली, हेही मोठ्या अभिमानानं सांगता येईल... बघा, विचार करा... तो तुम्हाला पटला तर मी माझ्या शंभर रुपयांपासून सुरवात करेन.     नाशिकपासून शंभर, दीडशे किलोमीटरवर असलेल्या मारुतीपाड्याला 12 जानेवारीला निघालो होतो. कळवण तालुक्‍यातील अभोणा या गावापासून कितीतरी कोसावर मारुतीपाडा... वीस-पंचवीस घरांचा... कुठल्यातरी डोंगराच्या कुशीत बिचकत बिचकत वसलेला... या पाड्यावर विश्‍वनाथ नावाचा 15 वर्षांचा मुलगा त्याच्या कुटुंबासह राहतोय... दहाव्या इयत्तेत शिकतोय... मधाच्या पोळ्यातील (आग्या मध नव्हे, पहाडाला लाकडाला चिकटलेला मध) नेमकी राणीमाशी पकडण्यात तो तरबेज आहे, असं कुणीतरी मला फोनवरून सांगितलं होतं. "फिरस्ती' वाचणारा हा युवक असावा. अलीकडे याबाबत खूप फोन येतात. फर्माईश होते.</description>
    <author>---</author>
    <pubDate>Sun,5 Feb 2012 22:0:36 +0550</pubDate>
  </item>
    <item>
    <title>भारतीय राज्यघटना आणि आपण</title>
    <link>http://72.78.249.126/DainikGomantak/20120122/5009420875094243623.htm</link>
    <description>डॉ. बाबा आढाव      जगातील सर्वात मोठी व प्रगल्भ लोकशाही भारतात आहे. येत्या गुरुवारी भारतीय प्रजासत्ताकाला 62 वर्षे पूर्ण होत आहेत. अशा वेळी काही प्रश्‍नही निर्माण होतात. घटनेतील सर्व तरतुदी समाजातील खालच्या स्तरापर्यंत पोचल्या आहेत का? आदर्श राज्यघटना व तिचे समाजातील प्रतिबिंब यात सुसंगती आहे का? विसंगती असेल तर ती का आहे? भारतीय जनता खरोखर कितपत सार्वभौम आहे?    "इंडिया'चे नामकरण 1950 मध्ये अधिकृतरीत्या "भारत' झाले. 26 जानेवारी 1950 ते 26 जानेवारी 2012 हा काळ लोटला, तरीही भारत इंडिया अशी वहिवाट सुरूच आहे. मानसिकता बदललेली नाही. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत इंग्रजांच्या जोखडातून मुक्त झाला. सरकारी कचेऱ्यावरील युनियन जॅक जाऊन तिरंगा ध्वज फडकला. तिरंगा स्वातंत्र्य चळवळीतील कॉंग्रेसचे निशाण होते. त्यात मध्यभागी चरखा होता. चळवळीत घोषणा होती, "चरखा चला चलाके, लेंगे स्वराज्य लेंगे!' 26 जानेवारी 1950 रोजी चरख्याच्या जागी अशोक चक्र आले. "सत्यमेव जयते' हे ब्रीदवाक्‍य बनले. घटना समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांची कायदा चौकट बाजूला सारून नवे संविधान व कायदा व्यवस्थेची सुरवात करून दिली.</description>
    <author>---</author>
    <pubDate>Sun,22 Jan 2012 7:30:0 +0550</pubDate>
  </item>
    <item>
    <title>सूरावटींचे सूर निखळले</title>
    <link>http://72.78.249.126/DainikGomantak/20120122/4888566336717220690.htm</link>
    <description>सुशील लाड     भारतीय संगीत    सृष्टीत आपल्या कर्तबगारीने विशेष ठसा उमटविलेले ऍन्थनी गोन्साल्वीस यांनी खरंतर संगीत सृष्टीला एक नवा आयाम दिला. त्यांनी आपल्या हयातीत केलेले अप्रतिम संगीत आजही संगीत रसिकांना भुरळ घालत आहे. त्यामुळे ते आज आपल्यातून गेले असले, तरी त्यांचे संगीत मात्र आपल्यासोबतच, नव्हे येणाऱ्या नव्या पिढीसोबतही अजरामर राहणार, हे निश्‍चित!    खरंतर ऍन्थनी गोन्साल्वीस या नावाची व्यक्ती प्रत्यक्षात असू शकते, यावर माझा तीन-चार महिन्यांपूर्वी विश्‍वासच नव्हता. "माय नेम इज ऍन्थनी गोन्साल्वीस' या गाण्यामुळे लहानपणापासून हे नाव ऐकत आलो असलो, तरी या नावाची व्यक्ती केवळ चित्रपटातच असू शकते, असे माझे ठाम मत होते. कारण या नावाच्या खऱ्याखुऱ्या व्यक्तीला मी यापूर्वी भेटलो नव्हतो वा त्याच्याबद्दल ऐकलेही नव्हते. पण नोव्हेंबरमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) मात्र माझ्या या समजुतीला चांगलाच धक्का बसला. कारण इथंच खऱ्याखुऱ्या ऍन्थनी गोन्साल्वीसबद्दल मला समजले.</description>
    <author>---</author>
    <pubDate>Sun,22 Jan 2012 7:0:0 +0550</pubDate>
  </item>
    <item>
    <title>फिरस्ती- भानगडवाडी ते शिवाजीनगर व्हाया बचत गट</title>
    <link>http://72.78.249.126/DainikGomantak/20120122/4641232458451710750.htm</link>
    <description>- उत्तम कांबळे     वसाहत आता चांगली झाली असंल, तर मग चांगलं नाव का असू नये, असा प्रश्‍न बायांना सातत्यानं पडू लागला. त्यातून झालं नामांतर... पन्नास वर्षांच्या वसाहतीला मिळालं "शिवाजीनगर' असं नाव. एक मोठं परिवर्तन झालं होतं. बायांच्या लढाईचं ते फलित होतं. याशिवाय कोणत्या तरी एका महाराजांनीही प्रयत्न केला होता. वसाहतीला असलेलं निंदाजनक नाव गळून पडलं आणि एका युगपुरुषाचं नाव लाभलं... बाया इतिहास घडवतात हे जसं खरं, तसंच इतिहासाला सादही घालतात, हेही तितकंच खरं... भानगडवाडी ते शिवाजीनगर हा प्रवास म्हणजे जणू एक छोटा इतिहासच आहे. कुणाच्या तरी लढण्यातून तो जन्माला आला आहे.   ""आता आमच्या गावाचं नाव शिवाजीनगर झालंय. जानोरी ग्रामपंचायतीत तशी नोंद झालीय. आमच्या पोरांनी तसा बोर्डही लावला व्हता. बघा की तो बोर्डाचा ऐंगल (अँगल) अजून दिसतोय. अंगणवाडीलाही तेच नाव आहे. बचत गटालाही तेच नाव आहे. शिवाजीनगरचं किती अप्रूप वाटतं म्हणून सांगू. बाई गं।।.''  शिवाजीनगरमधल्या आदिवासी महिला सांगत होत्या.  जेव्हा या वसाहतीत पोचलो तेव्हा शंभर शेळ्या-बकरी हाकत एक गुराखी बाहेर पडत होता.</description>
    <author>---</author>
    <pubDate>Sun,22 Jan 2012 6:30:0 +0550</pubDate>
  </item>
    <item>
    <title>यंत्र आणि मानव : याला राजकारण म्हणतात!</title>
    <link>http://72.78.249.126/DainikGomantak/20120122/5636733386628471517.htm</link>
    <description>- भारत सासणे    प्रवासाची सुरवात तर झाली. महाभारत युद्धानंतर हा देश आता कसा आहे, व या देशातील माणसं कशी जगत आहेत हे बघण्यासाठी आता बाहेर पडायचं आहे. आणि सोबत आहे आपला स्वीय सहायक बलराम. पण तत्पूर्वी पोशाख इत्यादीबाबत स्वतःला ठाकठीक करावं लागेल. माझा स्वीय सहायक त्या चारचाकी रथाकडे म्हणजेच ट्रककडे चालायला लागला. ट्रकचा चालक खिडकीतून डोकं बाहेर काढून अजूनही आमच्याकडे पाहत होता. त्याच्या डोक्‍यातून बाहेर पडणारे तरंग मी माझ्या पद्धतीने वाचत राहिलो. माणसाने बुद्ध, ख्रिस्त, व हिटलरच्या आठवणी आपल्या स्मृतीमध्ये जपलेल्या आहेत, पण कोणीतरी व कुठलातरी काठी घेऊन चालणारा म्हातारा माणूस त्यानं आपल्या स्मरणात अजून जपलेला नाही. बहुधा या माणसाचं नाव "गांधी' असं काहीतरी असावं. त्याऐवजी आता मानवाच्या मेंदूमध्ये मनोरंजन आणि भोगवाद ठासून भरलेला दिसतो. कारण ट्रकचालकाच्या दिशेनं जे जे काही बाहेर पडतं आहे, त्यात नाचगाणी, चित्रपट नावाचा आभास, पैसा आणि राजकारण असं काहीतरी मला वाचायला मिळतं आहे. हा आधुनिक माणूस "कोलावरी-कोलावरी' असं काहीतरी अगम्य ओरडतो आहे. माणूस सुखी आहे की दु:खी आहे हे येथून आता समजेल.</description>
    <author>---</author>
    <pubDate>Sun,22 Jan 2012 6:15:0 +0550</pubDate>
  </item>
    <item>
    <title>आवराआवर</title>
    <link>http://72.78.249.126/DainikGomantak/20120122/5321963344352778123.htm</link>
    <description>- हिरा दामले    गरीब - श्रीमंत असा भेदभाव नाही. मात्र परिस्थितीची जाण असणे गरजेचे असते. एखादी पंचाहत्तरी ओलांडलेली व्यक्‍ती त्यांनी आपली पुढची बोनस आयुष्याची वाटचाल युक्‍तीने करायला हवी. अपवाद वगळता सत्ता - मत्ता दोनही मर्यादित असतात. ताकद कमी झालेली असते. व्याधी नावाचे मित्र कमी अधिक प्रमाणात असतातच. ते शेवटच्या श्‍वासापर्यंत आपल्याला सोबत करतात. अशावेळी आवराआवर सतत करावी. आपली कामे आपणच करावी. औषधपाणी वेळेवर घेणे, गोळ्यांचे कागद एका पिशवीत ठेवणे, परिस्थितीनुरूप व आवश्‍यकतेनुसार जीभलीबाईला आवरणे वा संयम ठेवणे, वाचन - लेखन जमेल तसे करणे अध्यात्मामध्ये रमणे, दररोज चालून येणे, छोटी - छोटी कामे करणे वगैरे, स्वतःची जीवनशैली ठरवून त्याप्रमाणे वागणे.    "आवराआवर' तसा व्यापक अर्थाचा शब्द. अगदी प्रत्येकाबरोबर सावलीसारखा असणारा. कधी आवाक्‍यात वाटणारा तर कधी आवाक्‍याबाहेरचा. पण जाणवणारा मात्र आहेच, सकाळी - सकाळी अगदी जाग आल्यापासून तो आपल्या बरोबर असतो. जाग येताच स्वतःच अंगच प्रथम आवरून उठावे लागते. कारण झोपेत आपण कसेही झोपलेले असतो. नंतर आपले अंथरूण, पांघरूण आवरावे लागते.</description>
    <author>---</author>
    <pubDate>Sun,22 Jan 2012 6:0:0 +0550</pubDate>
  </item>
    <item>
    <title>यशस्वी सहजीवन</title>
    <link>http://72.78.249.126/DainikGomantak/20120122/4991530370604482675.htm</link>
    <description>- सुमेधा प्रमोद जोशी,   गवाणे, खोतोडे - वाळपई    माझ्या मते पूर्ण   पुरुष   किंवा सर्वगुण संपन्न अशी व्यक्ती भूतलावर सापडणार नाही. म्हणूनच संसार टिकवायचा असेल तर नवरा बायकोनं एक शब्द आपल्या डोक्‍  यात पक्का करून ठेवला पाहिजे तो शब्द म्हणजेच "तडजोड'. दोघांनीही संपूर्ण गुण व दोषांसह आपल्या जोडीदाराला स्वीकारायची   मनाची तयारी ठेवली पाहिजे.    ""तुम्ही आज परत पत्ते खेळायला जाऊ नका सांगून ठेवते. रात्रीचे 10.30 वाजलेत. तुम्हाला वेळेच काही भान बीन आहे की नाही?''  ""तू मला शिकवू नको मी कसं वागायचं, काय करायचं ते, तू आपलं काम कर.''  असे आवाज माझ्या कानी पडले आणि मला समजलं बायको - नवऱ्यामध्ये पुन्हा भांडण पेटलं. हे फक्त आजचं नव्हतं, दर दोन - तीन दिवसात असे आवाज, भांड्यांची आदळआपट ऐकू यायचीच आणि मग सगळं शांत व्हायचं. ही शांतता भयानक वाटायची. त्यादिवशी पण दार जोरात आपटल्याचा आवाज आला व त्यावरून मी अंदाज केला की नवरा रोजसारखा पत्ते कुटायला बाहेर पडला. ही दोघं इतकी भांडतात असं सांगितलं तर कोणाचाच विश्‍वास बसणार नाही.  मला आठवतं मी शेजारी असल्यामुळे मला पण लग्नाचं आमंत्रण होतं. लग्नात दोघं खूप खूष दिसत होते.</description>
    <author>---</author>
    <pubDate>Sun,22 Jan 2012 5:45:0 +0550</pubDate>
  </item>
  </channel>
</rss>
